Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनेक ठिकाणी जोरदार पाऊस , पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:36 IST)
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बंटिंग सुरु केली आहे. पावसामुळे अनेक ठिकाण पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे.  भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
हवामान खात्याने मुंबईत सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आणि उपनगरातील भागात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. दरम्यान या पावसाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला नाही. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
भंडारा जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्वाची आणि जीवनदायी मानली जाणारी नदी वैनगंगा सुद्धा दुथडी भरून वाहते आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३ मीटरने वाढली आहे. यामुळे भंडारा शहराला पुराचा धिक अधीकच वाढला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील टप्पा मोहल्ला, गणेश नगरी, ग्रामसेवक कॉलनी कपिल नगर या भागात पुराचे पाणी शिरत असल्याने तेथील नागरिकांना खबरदारीचा इशारा म्हणून जिल्हाप्रशासनाने विस्थापित केले आहे.
 
 गडचिरोलीत झालेल्या  मुसळधार पावसाने तिथले नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तेथील २० मार्गांवरील वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. पुराच्या फटक्यामुळे २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तर विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments