Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:06 IST)
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात हवामान विभागाच्या  अंदाजानुसार रविवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काहीसे ऊन देखील पडले होते. मात्र, यानंतर चार वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ढग दाटून आले व त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास पावसाने नाशकात जोरदार हजेरी लावली. पुढे संध्याकाळी सात वाजेपर्यत पाउस सुरुच होतो. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
 
सकाळपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होते. सुर्यदर्शनही तुरळक झाले. याशिवाय आज पहाटेपासूनच पावसाचे थेंब पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो  खरा ठरला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले.
द्राक्षबागांचे मोठे नुकसान
निफाडसह तालुक्यातील उत्तर भागात उगांव, शिवडी खॆडे, नांदुर्डी, थेटाळे भागात  दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अनेक ठिकाणी द्राक्षबागांच्या मणीसेटींग तसेच फुलोरा अवस्था होत्या. मुसळधार पावसासह जोरदार गारा झाल्यामुळे मणीगळ झाली आहे. शिवाय तयार झालेल्या द्राक्षमण्यांना चिरा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील पिकांसह जनावरांचा चारा जोरदार वाऱ्याने जमीनदोस्त झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

पुढील लेख
Show comments