Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किती हा दुटप्पीपणा? म्हणत फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (08:10 IST)
मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र देऊन केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी केली. पण यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, फडणवीसांनी केलेला कायदा फूलप्रुफ असता तर राज्यपालांना भेटण्याची वेळ आली नसती. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
 
फडणवीस यांनी म्हटलं की, 'मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा 'फुलप्रूफ' नव्हता! किती हा दुटप्पीपणा? मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. ... आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?'
 
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं होतं. मराठा समाजातून आक्रमक प्रतिक्रिया येत होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना देखील भेटणार असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments