rashifal-2026

त्या भुखंडाशी माझा काही संबंध नाही…मीरा बोरवणकरांच्या आरोपात तथ्य नाही- अजित पवार

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (08:45 IST)
येरवडा भुखंड प्रकरणाचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. मीरा बोरवणकरांनी जे काय आरोप केले आहेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. असा सांगताना माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून माझी कोणत्याही कागदपत्रावर सही नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यावर प्रसिध्दीसाठी करण्यात येणाऱ्या युक्त्यांसारखा हा प्रकार वाटतो असाही टोला अजित पवार यांनी मीरा बोरवणकरांना लगावला आहे. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर गंभिर आरोप केले होते. मीरा बोरवणकरांच्या या आरोपांचे खंडन करण्यासाठी अजित पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “संबंधित प्रकरणी मी त्यावेळच्या अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे खर आहे पण तो निर्णय घ्यायला मी कोणताही दबाव टाकला नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यावर मीही त्यावर पुन्हा चर्चा केली नाही.” असे अजित पवार यांनी सांगितले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ज्या त्या विभागाचे लोक पालकमंत्र्यांना आपल्या अडचणी सांगत असतात, त्यावेळी त्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो. तत्कालिन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, मी येरवाडा भूखंडाविषयी मीरा बोरवणकर यांना विचारल्यावर त्यांनी भूखंड बिल्डरला देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर मी त्या भुखंडाशी संबंधित प्रकरणावरून कधीही त्यांना विचारले नाही.” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल, आता अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल

महाराष्ट्रातील 24 नगर परिषदांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची प्रकृती बिघडली

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान, 11 वर्षांत 29 देशांनी सन्मानित केले

आज गोवा मुक्ती दिन, त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments