Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकाही मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर देशात तांडव होईल : मनसे

Webdunia
शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:40 IST)
मशिदींच्या भोंग्यांवरुन आता मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्हाला छेडले तर आम्ही सोडणार नाही. तसेच जर मशिद आणि भोंग्यांना हात लावला तर सर्वात पुढे पीएफआय असेल अशी धमकीच पीएफआयने मनसेला दिली होती. यावर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकाही मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर देशात तांडव होईल असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात तणाव आणि त्रास नको म्हणून शांत भूमिका घेतली आहे. यामुळे याचा अर्थ असा नाही की कोणीही आम्हाला धमकी देईल असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
 
मनसे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी पीएफआयच्या धमकीनंतर एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलकांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिलय हे स्पष्ट आहे. भोंग्यांविरोधात कारवाई झाली नाही तर हनुमान चालीसा लावण्यात येणार आहे. आम्हालासुद्धा महाराष्ट्रात तणावात्मक परिस्थिती नको आहे. याचा अर्थ असा कोणीही आम्हाला धमक्या देईल असा होत नाही असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
 
तसेच मुंब्रातील पीएफआयच्या आंदोलनावरुन संदीप देशपांडे यांनी थेट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याचे गृहमंत्री जो शहाणपणा मनसेला शिकवत आहेत. तो त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि पीएफआयच्या लोकांना शिकवावा अशी माझी त्यांना विनंती असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

दिल्लीत होणार भाजपच्या बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक,पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणार

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, असा झाला अपघात

अमोल कीर्तिकरांची जागा आम्ही जिंकली, आदित्य ठाकरेंनी EVM वर प्रश्न उपस्थित केला, कोर्टात जाणार म्हणाले

Blade in Air India Meal एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात सापडले ब्लेड, प्रवाशांनी केला गोंधळ, एअरलाइनला माफी मागावी लागली

पुढील लेख
Show comments