Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे : फडणवीस

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:37 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणल्यानंतर मुंबई भाजप कार्यालयात त्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून मतदारांनी मत दिलं आहे. गोव्यात भाजपची एकहाती सत्ता आली परंतु हा विजय साजरा केल्यानंतर आता मुंबईसाठी सज्ज व्हायचे आहे. लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. असा इशारा फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. 
 
कुठल्याच लढाईने होरपळून जायचे नाही. कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही. विजयाने नम्र व्हायचे विजयाने अधिक मेहनत करायची. खरी लढाई आता मुंबईत व्हायची आहे. मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचे नाही तर मुंबईला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय या महाराष्ट्रामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करतो.

संबंधित माहिती

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments