Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल : फडणवीस

Webdunia
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:35 IST)
दसरा मेळाव्यातील भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. “भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल”असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 
“राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून खुषखुषीत पद्धतीने, व्यंगातून किंवा अतिशयोक्तीतूनही मांडले जावेत”,असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था नीट राखली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
 
काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

एक्झिट पोलवर आत्मपरीक्षणाची गरज, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले

Gold Silver Rate Today : सोन्याचा भावात घसरण, चांदी चे दर घसरले

मतदार न्याय करतील, आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीवर म्हणाले

भारतीय महिला हॉकीची 'पोस्टर गर्ल' राणी रामपाल बनली प्रशिक्षक

दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर विमान कॅनडातील इक्लुइट विमानतळाकडे वळवले

पुढील लेख
Show comments