Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोणापालपर्यंत पाणी न आल्यास बेमुदत उपोषण करणार

Webdunia
बुधवार, 6 एप्रिल 2022 (07:09 IST)
बांदा: शेतीला पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला कवडीमोल दराने जमिनी दिल्या. मात्र गेली कित्येक वर्षे शेतकरी कालव्याच्या पाण्याची वाट बघत आहे. संशय येतो कि कालव्याचे काम शेतकऱ्याना पाणी देण्यासाठी आहे कि ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला जाग आणून सुद्धा आमच्या गावा पर्यत पाणी येणार असल्याचे आश्वासन आपल्याकडून देण्यात येते त्यामुळे येत्या आठ तारीख पर्यंत रोणापाल पर्यंत पाणी न आल्यास नऊ तारीखला सकाळपासून आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिला आहे. त्या प्रकारचे लेखी पत्र त्यांनी  कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाला दिले आहे.

या निवेदनात सरपंच सुरेश गावडे यांनी म्हटले कि, 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत आपण 15 मार्च 2022 पर्यंत पाणी  रोणापाल येथील 42व्या किलोमीटर पर्यत येईल असे लेखी आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात कोणतेच काम पाणी येण्याच्या दृष्टीने दिसले नाही परिणामी आम्ही परत  7 मार्च 2022 रोजी तुमची भेट घेतली असता तुम्ही 31 मार्च पर्यंत रोणापाल पर्यंत पाणी येईल असे आश्वासन दिले मात्र आज पर्यंत पाणी येण्याची कोणतीच आशा दिसत नसल्याने दिनांक 8 एप्रिल पर्यंत पाणी न आल्यास मी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन सरपंच गावडे यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना दिले आहे.याबाबतची प्रत सावंतवाडी पोलीस स्टेशन व तहसीलदार सावंतवाडी यांना दिली आहे.

संबंधित माहिती

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

पुढील लेख
Show comments