Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपुरमध्ये भिंत कोसळली, सहा जणांचा जागेवरच मृत्यू

Webdunia
गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (07:59 IST)
पावसामुळे पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटा शेजारील भिंत कोसळली. यात सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागातील घरात पाणी साठालेले होते तर ग्रामीण भागात शेत शिवार मध्ये पाणी साठल्याने मोठं नुकसान झाले.
 
परतीच्या पावसाने पंढरपूरला चांगलेच झोडपून काढले आहे. बुधवारी येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील असलेल्या कुंभार घाटा जवळ दुपारी अडीचच्या सुमारास दगडी बांधकाम असलेली भींत सततच्या पावसाने कोसळली. या भितींच्या आडोश्याला सहा लोक उभे होते. अचानक भिंत कोसळल्याने आडोश्याला उभे असलेले नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने ढिगारा काढण्याचे काम सुरु केले. 
 
यापैकी पाच जणांचा जागेवरच तर एकचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये गोपाळ अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव , पिल्लू उमेश जगताप आणि दोन अनोळखी महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

LIVE: रणबीर इलाहाबादियाला फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटातील २० आमदारांची सुरक्षा काढून घेतली

मनू भाकरने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

पुढील लेख
Show comments