Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपुरात वारकऱ्यांना बासुंदीतून झाली विषबाधा

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (10:12 IST)
पंढरपुरातील शेगाव दुमाला येथे विठ्ठल आश्रमात रविवारी दुपारी जेवण्यात खाललेल्या बासुंदीमुळे 40  वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जेवणानंतर सर्वांना पोटदुखी, उलट्या, जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यांना सरबवाना तातडीने रात्री पंढपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नदीपलीकडे असलेल्या शेगाव दुमाला येथे श्री विठ्ठल अआश्रम मठात चातुर्मासाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक वारकरी मुक्कामी आहे. या वारकऱ्यांनी रविवारी दुपारी जेवण केले आणि जेवणात बासुंदी, भाजी, चपाती, भजी असा बेत होता. सर्वानी बासुंदी खाल्ल्या नंतर अनेकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब असा त्रास होऊ लागला. अनेकांना त्रास होत असल्याचे निर्दशनास आल्या नंतर जेवणातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना बासुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व अन्नपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. 
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments