Festival Posters

‘वंचित’चा ‘इंडिया’त समावेश ही कार्यकर्त्यांची इच्छा;- सुजात आंबेडकर

Webdunia
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (21:04 IST)
2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह देशभरात अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रसच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये अनेक पक्ष सामिल होत असतानाच वंचित बहूजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनीही आता इंडिया आघाडीमध्ये सहभाही होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असून तसे झाले नाही तर याचा फटका काँग्रेसला बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
देशात 2024 साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर य़ुती केल्यानंतर वंचित बहुजव आघाडी इंडिया आघाडीमध्ये जाणार का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. पण, ‘इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला आमंत्रण न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं यापुर्वीच महाराष्ट्रातील 48 जागांवर लोकसभा निवडणूक लढणार असे घोषित केले आहे.

त्यानंतर आज एका टिव्ही चॅनेलशी बोलताना वंचित बहूजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भाजपाचा पराभव करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीनं वंचितला निमंत्रण देऊन समाविष्ट करायला पाहिजे. वंचित बहूजन आघाडीने आपल्या पहिल्या निवडणुकीत ४२ लाख मते घेतली आहेत. त्यामुळे वंचितच्या समावेशाने इंडिया आघाडीची ताकद नक्कीच वाढून महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएसचा निर्णयक पराभव करू शकतो.” असे ते म्हणाले.
 
पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडीबाबत प्रश्नही उपस्थित केला. ते म्हणाले, “इंडिया आघाडी विचित्र वागत आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नसून वंचितांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे का बंद आहेत? हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.” असे सुजात आंबेडकरांनी म्हटले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments