Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जालना : 22 जुलै पासून ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरवात

Webdunia
रविवार, 21 जुलै 2024 (13:23 IST)
सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसीला घेऊन प्रचंड तणाव आहे. मनोज जरांगे हे शनिवार पासून पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे. आता ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षणासाठी 22 जुलै पासून जन आक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेचे नेतृत्व आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे करणार आहे. यांच्यासह इतर ओबीसी नेते सहभागी होणार आहे. 

22 जुलै रोजी जालन्यातील दोडडगावातील मंडळ स्तम्भाला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी ओबीसी समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. 

ओबीसी आरक्षणावरून ओबीसी समाज राज्य सरकारवर संतापला असून आमचा रोष राज्यसरकार पर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ही यात्रा काढत आहो असे नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेंचा अध्यादेश काढता येणार नसल्याचे शब्द दिले होते. त्यांनी शब्द फिरवल्यावर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला. 
22 जुलै पासून ही आक्रोश यात्रा सुरु होऊन जालनाच्या रामगव्हाण, वडीगोद्री, बीड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यातून निघेल आणि छत्रपती सम्भाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संपणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments