Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर जायकवाडीचे दोन दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरु

jayakwadi dam gate open
Webdunia
नाशिक सोबत उत्तर महाराष्ट्रात गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना मराठवाडा मात्र अजूनही पाऊस झाला नाही. मात्र  नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दमदार  पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९० टक्के पेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला त्यामुळे  आता जायकवाडीचे दोन दरवाजे अर्धा फूटांनी उघडण्यात आले आहे. यातून एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. 
 
पूर्ण राज्यात आईवेळी कमी दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र दुष्कळा ग्रस्त मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. आता तर पावसाळा संपत आला असून, अजूनही त्या ठिकाणी  समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक धरण कोरडी पडली आहेत. तर दुसरीकडे गोदावरी नदीचाच उगम उगम असलेल्या नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार  पावसामुळे व नाशिकला आलेल्या महापुरामुळे जायकवाडीत पाणी आल्याने औरंगाबाद, जालना, परभणीसह काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
नाशिक, नगरकडून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी मोठ्या प्रमाणत भरत आले असून, त्यामुळे  नाथसागरात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याची अमलबजावणी करण्यात आली आहे. अजूनही नाशिक नगर येथे परतीचा पाऊस सुरु होणार आहे, त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणत पाणी जयकवाडीत जमा होईल त्यामुळे त्याचा फायदा औरंगाबाद सोबत जालना आणि इतर कोरड्या जिल्ह्यांना नक्कीच होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

8-10 दिवसांत नवीन टोल प्रणाली लागू केली जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा

पक्षाच्या प्रवक्त्यांबाबत उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, या 7 नेत्यांना दिले विशेष स्थान

नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने केले लज्जास्पद कृत्य,सहप्रवाशावर केली लघवी

LIVE: नागपूरच्या वैशाली नगरमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग

पुढील लेख
Show comments