suvichar

सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर ते....

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:06 IST)

धनगर समाजाचे आरक्षण आणि इतर प्रश्नांचा या सरकारला विसर पडला आहे, सरकारला आठवण करून देण्यासाठी आज आ. जयंत पाटील  धनगराच्या वेषात सभागृहात दाखल झाले. जयंत पाटील यांच्या आजूबाजूला उभं राहण्यासाठी आमदार आणि अनेक मातब्बर राजकारण्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण धनगर वेषात कोणी राजकीय नेता विधानसभेच्या सभागृहात दाखल झाला.. महाराष्ट्रातील धनगर समाजाने या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, आपला कोणीतरी वाली या सभागृहात असल्याचा आनंद व्यक्त केला.

या सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारला धनगर समाजाचा विसर पडला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या वेशात आलो. काठी हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर धनगर समाज हीच काठी हातात घेईल, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments