suvichar

सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर ते....

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:06 IST)

धनगर समाजाचे आरक्षण आणि इतर प्रश्नांचा या सरकारला विसर पडला आहे, सरकारला आठवण करून देण्यासाठी आज आ. जयंत पाटील  धनगराच्या वेषात सभागृहात दाखल झाले. जयंत पाटील यांच्या आजूबाजूला उभं राहण्यासाठी आमदार आणि अनेक मातब्बर राजकारण्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण धनगर वेषात कोणी राजकीय नेता विधानसभेच्या सभागृहात दाखल झाला.. महाराष्ट्रातील धनगर समाजाने या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, आपला कोणीतरी वाली या सभागृहात असल्याचा आनंद व्यक्त केला.

या सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारला धनगर समाजाचा विसर पडला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या वेशात आलो. काठी हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर धनगर समाज हीच काठी हातात घेईल, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

होर्मुझची सामुद्रधुनी सुरु झाली; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये १०% भाडेवाढीमुळे एसटी बसचा प्रवास महाग झाला

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य, नियमांचे उल्लंघन केल्यास मान्यता रद्द होणार

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments