Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kalyan : गरोदर महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बाळाला जन्म दिला

Webdunia
रविवार, 10 सप्टेंबर 2023 (11:01 IST)
डॉक्टरांना देवाच्या नंतरचा दर्जा दिला गेला आहे. पण कल्याण मध्ये डॉक्टरांचा अमानुषकी पणाचा प्रकार दिसून आला आहे. येथे एका रुग्णालयात डॉक्टरांनी गरोदर महिलेला दाखल करण्यास नकार दिल्यामुळे या महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टरांचा आणि रुग्णालयाचा कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे 
 
सदर घटना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची आहे कल्याणच्या स्काय वॉक वर एका गरोदर महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या. नागरिकांनी पोलिसांना तातडीनं कळवलं.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला नागरिकांच्या मदतीने एका हातगाडीवर ठेवून रुक्मिणी रुग्णालयात नेले असता तिथल्या डॉक्टरांनी आमच्या कडे स्टाफ नाही आम्ही या महिलेला दाखल करून घेणार नाही असे उत्तर दिले. या वर पोलीस आणि नागरिकांनी तिला दाखल करू तिची प्रसूती करण्याचे डॉक्टरांना म्हटले. मात्र रुग्णालयाच्या स्टाफने चक्क नकार दिला.

महिला प्रसूती वेदनेने कळवळत होती तिचे बाळ अर्ध बाहेर आलेले असून देखील स्टाफने दाखल करण्यास नकार दिल्यामुळे काही वेळाने महिलेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिला. सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे. प्रसूती नंतर महिला आणि तिच्या बाळाला रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयात पाठविले. या प्रकरणाबद्दल रुक्मिणी रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले की आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सांगितल्याशिवाय काहीही उत्तर देणार नाही. नागिरकांनी रुग्णालयाच्या या कारभारामुळे संताप व्यक्त केला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Porsche car Accident Case : पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट,अल्पवयीन आरोपीने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिला

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

सर्व पहा

नवीन

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

पुढील लेख
Show comments