Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्याला मोठा दिलासा खडकवासला धरण पूर्ण भरले

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2019 (16:20 IST)
मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातही मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर आता मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू केला आहे. या पाण्याच्या विसर्गानंतर नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांना सासनाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे. मुसळधार सततच्या पावसाने खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. यानंतर मध्यरात्री दोन वाजल्यापासून मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यानंतर नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. कारण मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा वेग १७०० क्युसेक इतका आहे.पुरेसा जलसाठा झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कारण असे अनेक ठिकाणं आहेत जिथे कमी प्रमाणात पाऊस झाला आहे आणि तेथील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पिंपळगाव, जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खकडकवासला धरण पूर्ण भरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आणखी दिलासादायक बाब अशी की, केवळ खडकवासलाच नाही तर, पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

पॅकेटमध्ये मेलेला उंदीर, मुलांच्या पोषण आहाराबाबत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला

LIVE: पालघरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली

खोक्या भाईंच्या अटकेवरून राजकीय गोंधळ, आता मी गप्प बसणार नाही म्हणाल्या पंकजा मुंडे

पुढील लेख
Show comments