Marathi Biodata Maker

राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरण भोवणार ?

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:06 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात देशव्यापी वातावरण निर्मितीसाठी पुढे आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी होणाऱ्या ईव्हीएमविरोधी मोर्चासाठी निमंत्रण देण्यासाठी पश्चिम बंगालला देखील गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन निमंत्रण देखील दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राज यांनी जो प्रचार केला होता, मात्र स्वतःचे उमेदवारच नसल्याने त्याचा फारसा परिणाम  झाला नाही. असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची डोकेदुखी होऊ शकते असे चित्र आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असून, लवकरच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्याची येणार आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या व्यवहारामध्ये राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, व्यवहारावरून राज ईडीच्या यादीमध्ये असल्याची चर्चा आहे.
 
राज यांचा पक्षाचा मुंबई-पुणे-नाशिक मध्ये प्रभाव आहे. या पटट्यात सत्ताधारी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज यांची तोफ नियंत्रित करणासाठीही प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान, ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील टप्पा म्हणून राज यांना समन्स बजावण्यात येणार आहे. त्यामुळे राज यांच्न्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

रेल्वेच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध रहा; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

बालभारती पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध महाराष्ट्र सरकार मोहीम सुरू करणार

अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा करण्यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या नक्कल विरोधात फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली, १०७ केंद्रांची मान्यता रद्द केली

पुढील लेख
Show comments