Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर: पार्कींगच्या जागेवर सांस्कृतिक कार्यक्रम; नवरात्रीमध्येच दसरा चौक मैदानातील पार्कींग बंद

Mahalaxmi devi Kolhapur
Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (09:01 IST)
कोल्हापूर नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात नऊ दिवस 30 लाख भाविक येण्याचा अंदाज खुद्द पोलिस प्रशासनाने वर्तवला आहे. या तुलनेत शहरात पार्कीग व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता आहे. असे असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दसऱ्या चौकातील मैदानात वाहने पार्कींगला यावर्षी बंदी घातली आहे.

100 ते 150 वाहने यामुळे पार्कींग होणार नाहीत. विशेष म्हणजे मैदानाच्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. ‘अजब जिल्हा प्रशासनाला गजब कारभार’ या निमित्ताने समोर आला आहे.
 
नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी प्रचंड होते. शहरातील नियमित महापालिकेची पार्कींग ठिकाणे सोडून 12 ठिकाणी पार्कींगची सोय केली आहे. यामध्ये दसरा चौकातील पार्कींगचाही समोश होता. मुळातच येणारे भाविक आणि केलेली पार्कींगची सोयही तोकडीच ठरणार आहे. यामध्येच दसरा चौक येथील मैदानातील ऐनवेळी पार्कींग बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
वास्तविक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी इतरही पर्याय आहेत. शाहू स्मारक हॉल जिल्हा प्रशासनाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहामध्ये कार्यक्रम घेतला जाऊ शकतात. परंतू पार्कींगसाठी शहरात पर्याय मर्यादीत आहेत. मंदिर परिसरात जागा नाही. 30 लाख भाविक येणार असे गृहित धरले तरी शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रोज सुमारे 30 ते 40 हजार वाहनांची पार्कींगची सोय होईल, असे नियोजन होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने दसरा चौकाला पर्याय व्हिनस कॉर्नर येथील गाडी येथे पार्कींग करण्याचे ठरविले आहे. परंतू मनपाचे येथे अगोदर पार्कींग होतेच. हा नवीन पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीमध्ये अनेक वर्षापासून सुरू असणारे मोफत पार्कींग बंद करून मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामागे नेमका सुत्रधार कोण हे शोधण्याची वेळ आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments