Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुरला महापुराचा धोका

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (11:13 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असल्यामुळे पुरस्थिथी निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूरकडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत. 
 
कोल्हापूर जिल्ह्यात ‍चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधतेचा इशारा‍ दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरफएच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकार्यांनी सांगितले. 
 
कोल्हापूर जिल्ह्याच्या पशिचम भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्याबची पाणी पातळी ही 34 फूट 6 इंच इतकी झाली आहे. हळू हळू पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असल्यामुळे प्रशासन आत्ता अधिक सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments