Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिमग्याच्या उत्सवावर आणि पालखीच्या सणावर कोरोनाचं सावट

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (11:02 IST)
कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिमग्याच्या उत्सवावर आणि पालखीच्या सणावर कोरोनाचं सावट आलं आहे. कोकणात जायला निघाल्या चाकरमान्यांनी गावाला जाण्याआधी कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोनामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. त्यानंतरही शिमग्याच्या सणाला येणाऱ्या चाकरमान्यांनी दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. 
 
'हे' नियम पाळणे बंधनकारक 
कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. 
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
 
पालखी उत्सवावर निर्बंध
यंदा पालखीचा उत्सव अतिशय साधेपणाने होणार आहे. गपणती पाठोपाठ आता होळीच्या सणावरही कोरोनाचं सावट पसरलं आहे. गणेशोत्सव आणि होळी हे कोकणातील दोन मोठे उत्सव. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.
 
यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गावागावांत ग्रामदेवतेच्या पालख्या रात्री नाचवल्या जातात. तसेच गावात नमन-खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.त्यावर बंदी आणली आहे. कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments