Dharma Sangrah

दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने खूप त्रास दिला- आ. एकनाथ खडसे

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (22:35 IST)
आ. एकनाथ खडसे  यांचे एकेकाळी भाजपच्या मोठ्या नेत्यांमध्ये नाव होते. पण, मध्यंतरी ते भाजपपासून दूरावले गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्यांनी पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपवर सातत्याने टीका करतात. आता त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 
भाजपने ओबीसींना त्रास दिला
प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, 'दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने  खूप त्रास दिला आणि तसाच त्रास आता पंकजा मुंडे यांनाही दिला जातोय. भाजपने नेहमीच ओबीसींना त्रास दिलाय. आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांसारख्या अनेक नेत्यांचा पक्षाने अनेकदा अपमान केला आहे. त्यानंतर माझ्यावर आणि आता पंकजा मुंडेंवरही पक्षातील काही नेत्यांकडून अन्याय झाला आहे.'
 
मुंडे साहेबांवर अन्याय
ते पुढे म्हणाले की, 'गोपीनाथ मुंडे आणि मी तीन दशकाहून अधिकाळ पक्षासाठी काम केले. त्यावेळी वाणी-ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. आम्ही ती ओळख पुसली आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भाजपला ओळख मिळवून दिली. पण, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी मुंडे साहेबांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचारही आला होता,' असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments