Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंजारा क्रांती दलाकडून मुख्यमंत्री यांना संजय राठोड यांची चौकशी करावी असे पत्र

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:28 IST)
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा असल्याचं आतापर्यंत दिसत होतं. मात्र, आता एक नवं ट्विस्ट आलं असून बंजारा क्रांती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांची चौकशी करावी असं पत्र पाठवलं आहे. हे पत्र भाजपने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. हे पत्र शेअर करताना भाजपने राज्य सरकार आता तरी चौकशी करणार का? असा सवाल केला आहे.
 
संजय राठोड मंगळवारी तब्ब्ल १५ दिवसानंतर सर्वांसमोर आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं. मात्र, यात आता नवा ट्विस्ट आला आहे. बंजारा क्रांती दलाने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. “बीड येथील बंजारा तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी आपल्या सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत बंजारा आणि अन्य समाजात मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन सत्य समाजासमोर येणं आणि दोषींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्रातील बंजारा बांधवांच्या भावना प्रक्षुब्ध असून सरकार दोषींना पाठिशी घालत असल्याचे समाजाचे मत बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी होऊन दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी,” असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments