Dharma Sangrah

अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यातील वादामुळे राज्यात लोडशेडिंग?

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:45 IST)
राज्यात सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे सर्वसामान्यांना उन्हाच्या तडाख्यात आणखी एक मोठा झटका बसला आहे. जेथे वीज बिलांची थकबाकी अधिक आहे, तेथे लोडशेडिंग सुरू केल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. या समस्येला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच थेट आरोप केला आहे. त्यामुळे त्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
 
बावनकुळे म्हणाले की, राज्यात तब्बल १५ लाख शेतकऱ्यांची वीजेची जोडणी तोडण्यात आली आहे. राज्यात एकाही भागात सलग २ तास शेतकऱ्यांना वीजेचा पुरवठा होत नाहीय. दुर्गम, आदिवासी भागात सर्वाधिक लोडशेडिंग होत आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वादामध्ये राज्यातील जनता होरपळून निघते आहे, असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

लोडशेडिंगला केंद्राला जबाबदार धरण्याचा घाणेरडा प्रकार राज्य सरकार करीत आहे. मुळात राज्य सरकार कोळसाच खरेदी करु शकलेले नाही. तिन पक्षांच्या या सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. भाजप सरकारच्या काळात एक तासाचेही लोडशेडिंग झाले नाही. उन्हाची तीव्रता वाढत असताना वीजेची टंचाई निर्माण होणे हे अयोग्य नियोजनाचाच परिणाम असून त्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments