Dharma Sangrah

लॉग मार्च यशस्वी, मात्र अंमलबजावणी सुरु होईपर्यत माघार नाही, नेते जे.पी गावित यांची माहिती

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2023 (21:24 IST)
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातून निघालेले लाल वादळ अर्थात शेतकरी, आदिवासी यांचा लॉग मार्च यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला. काही मागण्या या विचारधीन आहेत. त्यावर जोपर्यंत सरकार त अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार अशी माहिती आंदोलनकर्त्यांचे नेते जे.पी गावित यांनी दिली आहे.
 
याआधी शेतकऱ्याच्या १२ जणांच्या शिष्ठ मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुमारे दोन ते तीन तास बैठक चालली. त्यानंतर याबाबत गावित यांनी माहिती दिली. यात जोपर्यंत मागण्यांवर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मोर्चातून माघार घेणार नाही. मागील मोर्चाचा आम्हाला अनुभव आहे, आश्वासन दिले जाते. मात्र अंमलबजावणी केली जात नाही. यावेळी आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिली आहे, असे गावित यांनी सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंद येथे थांबणार आहे. मात्र सरकारकडून आश्वासनांची अंमलबजावणी सुरु झाल्यांनतर मोर्चा मागे फिरणार आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments