Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉन्ग मार्च इगतपुरी तालुक्यात दाखल, मात्र अजूनही चर्चा नाहीच

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (21:43 IST)
शेतकरी आणि आदिवासींच्या वन जमिनी प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा लाँग मार्च मुंबईपर्यंत धडकू नये यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक काही कारणास्तव रद्द झाली. हा लाँग मार्च आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान हे लाल वादळ मंगलवारी दुपारी इगतपुरी तालुक्यात दाखल होत घोटी शहरापर्यंत पोहचले.
 
रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून आदिवासींचे हे लाल वादळ विधिमंडळावर मोर्चा घेऊन निघाले आहे. सोमवारी नाशिक जवळील आंबे बहुला गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईकडे निघाले. मोर्चात सुमारे दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. येत्या 23 मार्चपर्यंत मुंबई गाठण्याचे नियोजन आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाच जणांचे शिष्टमंडळ  मुंबईकडे रवाना झाले असून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. एकीकडे चर्चा सुरू असली तरी मोर्चा मात्र मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असल्याचे मोर्चेकऱ्यानी सांगितले आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments