Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:36 IST)
राज्यात पावसाचा जोर सुरूच आहे. सध्या राज्यात अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली. नुकसान झालेल्या भागात येऊन पिकांचे पंचनामे तातडीने करावे. अशी मागणी बळीराजा करत आहे. झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहे.   
अवकाळी पावसामुळे ऊस ,कापूस, धान, हरभरा ,गहू पिके खराब झाली असून  शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र  महसूल प्रशासनाकडून अद्यापही 
कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे .राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे  हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असून पिकांवर अळ्या लागत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना पडला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी एका नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला

PM मोदी मॉरिशसच्या दौऱ्यावर

वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर हल्लाबोल करीत उद्धव ठाकरे अर्थसंकल्प बोगस असल्याचे म्हणाले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments