suvichar

गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया सायकल रॅलीची सुरुवात

Webdunia
सोमवार, 19 डिसेंबर 2016 (12:45 IST)
डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन हे बंधूंच्या फोर्स मोटर्स प्रायोजित 'गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया’ या देशासाठी समर्पित या मोहिमेला गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून उत्साहात सुरुवात झाली. भारतीय नागरिकांना नियम पाळण्याविषयीचे प्रबोधन या मोहिमेत करण्यात येणार असून इंग्रजी आणि हिंदी भाषेत १६००० हून अधिक पत्रके छापण्यात आली आहेत.
 
फोर्स मोटर्सचे चेअरमन अभयजी फिरोदिया, झी २४ तास चे कार्यकारी संपादक उदयजी निरगुडकर, कॅबिनेट मंत्री एकनाथजी शिडे, नाशिक सायकलीस्टचे जसपाल सिंघ विर्दी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी हितेंद्र महाजन यांनी मदत केलेल्यांचे सर्वांचे आभार मानले आणि मोहीम संपेपर्यंत सदिच्छांचा सोबत राहू देण्याचे आवाहन केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला येणे शक्य झाले नसले तरी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाजन बंधूंच्या मोहिमेची माहिती लोकांना दिली व त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.  
सुरुवातीची ३० किलोमीटर्सचे अंतर महाजन बंधूंनी सोबत कापले. व नंतर महेंद्र महाजन विश्रांतीसाठी युटीलिटी वाहनात विश्रांती घेण्यासाठी थांबले. पहिल्या दिवसाच्या प्रवासात बेळगाव पर्यंत पोचण्याचे ठरविण्यात आले असून दुसऱ्या दिवशीच्या रात्री बेंगळूरू गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्येक मोठ्या शहरात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पत्रकारांशीही संवाद शाध्ण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments