Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Weather Update काही ठिकाणी उष्णतेचा तर कुठे पावसाचा इशारा

जाणून घ्या पुढील पाच दिवसांची हवामान स्थिती

Weather
Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (12:15 IST)
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांच्या दिलासानंतर रविवारपासून पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात उष्णतेची लाट लक्षणीयरीत्या वाढली आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, परभणी आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्मा जाणवत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून पाऊसही पडण्याची शक्यता आहे. काही भागात गारपीटही होऊ शकते. या काळात काही भागात कमालीचा उष्मा राहील.
 
IMD ने यलो अलर्ट जारी केला
सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 6 मे रोजी अकोला, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया परिसरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 5 ते 12 मे दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. या काळात राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांमध्ये गडगडाटी वादळासह पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments