Marathi Biodata Maker

सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू

Webdunia
शुक्रवार, 21 मार्च 2025 (15:08 IST)
Maharashtra News: महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश सरकारने जारी केले आहे. विधान परिषदेत माहिती देताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाईल. राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.  
ALSO READ: पंजाबमध्ये मनीष सिसोदिया यांना प्रभारीपदाची जबाबदारी
तसेच शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा मंजूर केला आहे. हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे, ज्या अंतर्गत इयत्ता 3 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्याची योजना आहे. 
ALSO READ: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे महागणार, १ एप्रिलपासून नवीन टोल दर लागू होणार
तसेच भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की सीबीएसई अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जातील आणि नवीन सत्र १ एप्रिलपासून सुरू होईल. 
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेतला, ज्यामध्ये शिक्षण विभागाची बैठक देखील समाविष्ट होती. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा एकदा अग्रगण्य स्थान प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आणि सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची सूचना केली. 
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments