Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासदार सुजय विखे पाटलांची नागरिकांसाठी अभिनव स्पर्धा! थेट विमानाने घडवणार अयोध्येतील रामदर्शन

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2024 (10:11 IST)
२२ जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच या राम मंदिर सोहळ्या निमित्त सुजय विखे पाटील यांच्या वतीने 'मेरे घर आये  श्रीराम' ही योजना देखील आखण्यात आली आहे.
 
भाजप खासदार सुजय विखे यांच्या कल्पनेतून अहमदनगर वासियांसाठी खास 'मेरे घर आये श्रीराम' हा खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील व्यक्ती 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घराची सुंदर सजावट देखावा तयार करून त्यांना दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवतील.
 
व्हाट्सअपवर आलेल्या देखाव्यातून पहिल्या तीन कुटुंबाची निवड खासदार सुजय विखे पाटील हे करणार असून निवड निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन कुटुंबातील प्रत्येकी दोन व्यक्तींना खासदार सुजय विखे पाटील हे विमानातून अयोध्यातील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडवणार आहेत.
 
 
22 जानेवारी रोजी आयोध्येत श्री प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चार किलो साखर आणि एक किलो डाळ वाटप करण्यात आली.
 
त्यानंतर आता 'मेरे घर आये श्रीराम' या संकल्पनेतून निवडण्यात येणाऱ्या पहिल्या तीन कुटुंबातील व्यक्तींना सुजय विखे पाटील हे विमानाने रामाचे दर्शन घडवणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून विखेंकडून ही पेरणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. 

Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

...तर Pok चे भारतात विलीनीकरण शक्य झाले असते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे वक्तव्य

आर्वीमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या 3 जणांना अटक, वनविभाग ने मांस विक्री करतांना पकडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा भारत आणि पाश्चात्य देशांसाठी का आहे महत्त्वाचा?

शाळेमध्ये 10वी क्लासच्या विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू

Pune अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले

सर्व पहा

नवीन

विक्ट्री परेडचा असली हिरो मुंबई पोलीस शिपाई, गर्दीमध्ये असे वाचवले महिलेचे प्राण

महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

मुंबई हिट अँड रन केस वर्ली प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

‘खासगी कॉलेजात सव्वा कोटी रुपये मागितले,’ भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी परदेशात का जातात?

मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळा -कॉलेजांना सुट्टी जाहीर

पुढील लेख
Show comments