Marathi Biodata Maker

घरचे खाद्य पदार्थ सिमेगृहात, नाट्यगृहांमध्ये खावू द्या – न्यायलयात याचिका

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (15:50 IST)
आपण सर्वाना हा अनुभव आला असेल की जेव्हा आपण सिनेमागृहांमध्ये आणि नाट्यगृहांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या कडील अन्नपदार्थ काढले जातात आणि आपल्यावर तेथील महागडे पदार्थ खाण्याची सक्ती केली जाते. अश्या वेळी अनेकदा भांडणे होतात. तर लहान मुलांना तहान लागली तर महागडे पाणी विकत घ्यावे लागते, या अन्यायकारी वागणुकी विरोधात उच्च न्यायलयात अर्ज केला गेला आहे. अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. फास्ट फूड खरेदीच्या सक्तीमुळे घटनेच्या कलम २१ नुसार, जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.  कोणत्याही प्रेक्षागृहात घरगुती अन्नपदार्थ घेऊन जाण्यास मनाईसाठी कायद्याचा आधार नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.  त्यामुळे आता सामान्य नागरिकाला होणारा त्रास कमी होणार आहे आणि लवकरच न्यायालय जसा निर्णय देईल तसा राज्यातील सर्व ठिकाणी आपले घरचे अन्न खाता येणार आहे.

यावर न्यायलय विचार करत असून ही स्थिती मुंबई सह महाराष्ट्र आणि पूर्ण देशात आहे. त्यामुळे येणारा निर्णय हा मोठा असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments