Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (17:20 IST)
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा सवाल
 
मुंबईत कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई होत असेल तर मान्सूनसाठी सज्ज असण्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments