Dharma Sangrah

2 महिन्यापासून 29 तारीख मुंबईकरांसाठी अशुभ

Webdunia
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईकरांसाठी महिन्याची २९ तारीख अशुभ ठरत आहे. या दिवशी मोठे अपघात, नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बरोबर महिन्याभरापूर्वीच्या अर्थात २९ ऑगस्टला प्रचंड पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसाने त्यादिवशी  विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा जीव घेतला.

२९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठले.  ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांना घर गाठणे अशक्य झाले.

आता मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  39 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments