Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन – नवाब मलिक

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:57 IST)

अद्यापही मुंबई विद्यापीठाच्या ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले गेले नाहीत. त्यामुळे या विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन असेच म्हणावे लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी लगावला. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.

मलिक म्हणाले की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत त्यात मोठी तफावत जाणवली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या चुका आढळून आल्या आहेत. या परिस्थितीला राज्य सरकार तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनाबाबत बोलताना मलिक म्हणाले की मनसेला आता कोणी विचारत नाही, निदान या आंदोलनामार्फत तरी राजकीय यश मिळेल का यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. फेरीवालाविरोधी आंदोलन जरी मनसेचे असले तरी मुख्यमंत्री त्याला हँडल करत आहेत असा आरोप मलिक यांनी केला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments