Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'हल्लाबोल' पदयात्रा

Webdunia
येत्या १ ते ११ डिसेंबर दरम्यान यवतमाळ ते नागपूरपर्यंत या नाकर्त्या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'हल्लाबोल' पदयात्रा काढण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवशी, १२ डिसेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे जाहीर सभा घेण्यात येईल. वाढदिवसापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे. आज मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची या आंदोलनाच्या नियोजनासंबंधी बैठक झाली, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली.
 
या आंदोलनाआधी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी कराड येथेही एक व्यापक आंदोलन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawar यांच्या नेतृत्वात होईल. २५ ते ३० तारखेपर्यंत राज्यातील इतर भागात कार्यकर्त्यांनी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित करत या सरकारविरोधात आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या वतीने केले आहे.
 
यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील , विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , ज्येष्ठ नेते गणेश नाईक , कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले , मुख्य प्रवक्ते नवाब मलिक , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोटे , आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments