Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू नव आयुष्याचे स्वप्न अधुरे राहिले

Webdunia
सोमवार, 27 मे 2019 (17:52 IST)
बीड जिल्ह्यात एक वाईट घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदावर विरजण पाडणारी एक दुर्दैवी घटना म्हणता येतील. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नवरदेवाचा हृदय विकाराने अकाली मृत्यू झाला आहे. त्यामुळे नव वधूचे एक नवीन आयुष्य सुरु करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. 
 
अशोक करांडे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव असून, वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवासी होते. नागपूर येथे अशोक हे कंपनीत नोकरीस होते. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. तर त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. अशोकचे लग्न 21 मे रोजी माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर हे नवदांपत्य सुखरुपरीत्या देवदर्शन घेऊन आले होते. त्यानंतर बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी सर्व जेव्हा जात होते तेव्हा अशोक यांना अचानक भोवळ आली व ते दुचाकीवरुन कोसळले होते. यानंतर जवळच असलेल्या  नागरीकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे नव वधूने पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा निश्चित, गुढीपाडव्याला हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन घेणार!

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा निश्चित

औरंगजेबाच्या वादावरून शरद पवारांनी दिले आदेश या पुढे हॅलो नाही जय शिवराय म्हणा

उत्तर मॅसेडोनिया नाईटक्लबमध्ये आग लागून 51 जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू

पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला,90 सैनिक ठार

पुढील लेख
Show comments