Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू नव आयुष्याचे स्वप्न अधुरे राहिले

Webdunia
सोमवार, 27 मे 2019 (17:52 IST)
बीड जिल्ह्यात एक वाईट घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदावर विरजण पाडणारी एक दुर्दैवी घटना म्हणता येतील. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नवरदेवाचा हृदय विकाराने अकाली मृत्यू झाला आहे. त्यामुळे नव वधूचे एक नवीन आयुष्य सुरु करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. 
 
अशोक करांडे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव असून, वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवासी होते. नागपूर येथे अशोक हे कंपनीत नोकरीस होते. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. तर त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. अशोकचे लग्न 21 मे रोजी माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर हे नवदांपत्य सुखरुपरीत्या देवदर्शन घेऊन आले होते. त्यानंतर बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी सर्व जेव्हा जात होते तेव्हा अशोक यांना अचानक भोवळ आली व ते दुचाकीवरुन कोसळले होते. यानंतर जवळच असलेल्या  नागरीकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे नव वधूने पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले आहे.
 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments