Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाडला

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाडला
Webdunia
राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाड येथे झाली आहे. या ठिकाणी ४ डिग्री सेल्सिअस तपमान नोंदविले गले आहे.गेल्या काही दिवसापर्यंत गुलाबी वाटणारी थंडी आता नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. नाशिमध्ये पारा ६ अंशावर होता तर निफाडमध्ये  तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची ही नोंद झाली आहे. आता नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर थंडीचा परिणाम झाला आहे. विशेष करून जेष्ठ नागरिकांना थंडीचा त्रास अधिक जाणवत आहे. तर वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतीदार चिंतेत सापडला आहे.
 
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष बागा या निफाड तालुक्यात आहेत. राज्यात सातत्याने नीचांकी तपमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी, पिंपरी, सुकेणे, चांदोरी, कोकणगाव, पिंपळगाव या भागात होत आहे. त्यामुळे थंडीमुळे निफाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. निफाड तालुक्यासह कादवा, बाणगंगा, गोदा खोऱ्यात थंडीचा जोर कायम आहे. पिंपळगाव, निफाड, सुकेणे, ओझर या भागातील द्राक्षांना या थंडीचा फटका बसत आहे. सुरुवातीला पडलेली थंडी ही  द्राक्षासाठी पोषक होती. मात्र पारा सातत्याने खाली गेल्याने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष मणी फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतीदार चिंतेत सापडला आहे. अनेक द्राक्ष बागामध्ये तापमान वाढवण्यासाठी  शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर काही बागायतीदारांनी बागे भवती मोठ मोठी कापडे गुडाळली आहेत. जेणेकरून द्राक्षाना थंडी कमी लागेल. शहरी भागात लोक गरम कपडे दिवसभर परिधान करून ठेवत आहेत. रस्त्यावर गर्दी कमी झाली आहे. दिवसभर चहाच्या टपर्यांवर गर्द्री दिसत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

मुंबई: मोबाईलवर गेम खेळताना ४२००० रुपये गमावले, तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची केली निर्घृण हत्या

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

कुणाल कामराला मोठा दिलासा, हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

उल्हासनगरमध्ये भिंत कोसळल्याने मजुराचा मृत्यू

रुग्णांच्या खिशावरचा भार वाढणार, या आजारांसाठी औषधे महाग होऊ शकतात

पुढील लेख
Show comments