Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिवारपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘नो लस, नो एंट्री’

Webdunia
गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:29 IST)
नाशिक जिल्ह्यात वाढता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मंदिरात १० वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांंना दर्शनासाठी शनिवार (दि.०८) पासून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
 
दरम्यान सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्या भाविकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील अशा भाविकांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिरात १० वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांंना दर्शनासाठी मज्जाव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी लसीकरण असणे महत्वाचे ठरणार आहे.
 
संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन ची धास्ती वाढत असून त्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक केले जात आहेत. सप्तशृंगी देवी ट्रस्टनेही नुकतीच दर्शनासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ आता त्र्यंबक देवस्थाननेही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर मंदिरे उघडल्यानंतर त्र्यंबकला भाविकांचा गर्दी वाढली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून येत्या शनिवारपासून लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे.
 
त्र्यंबकेश्वेरी भाविकांचा राबता असतो. नुकतेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भेट दिली होती. तर कालच अभिनेत्री शिल्पा शेट्टी सह पती राज कुंद्रा यांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. दरम्यान त्र्यम्बक देवस्थान या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून म्हणजेच ०८ जानेवारीपासून करणार असल्याचे ट्रस्टचे चेअरमन विकास कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

LIVE: रणबीर इलाहाबादियाला फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटातील २० आमदारांची सुरक्षा काढून घेतली

मनू भाकरने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

पुढील लेख
Show comments