Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यांच्या असण्या-नसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2019 (13:22 IST)
ज्या व्यक्तीला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या असण्यानसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही, असा हल्लाबोल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात पंकजा यांनी अप्रत्क्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच मी पक्ष सोडणार नाही, पण पक्षाने मला सोडावे का नाही, हा त्यांचा प्रश्न असल्याचे म्हटले. यावरुन काकडे यांनी पंकजा यांचा समाचार घेतला.
 
ते म्हणाले, पंकजा यांच्या कालच्या मेळाव्याला फारशा गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे मंत्री असूनही तिथल्या लोकसभेची खासदारकी कुटुंबात असूनही जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते. चाळीस वर्षे राजकारणात असूनही ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. पंकजा यांनी कोणालाच जवळ केले नाही. मराठा समाज, मुस्लीम समाज, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच ते पराभूत झाल्या आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments