Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल केला जाण्याची शक्यता

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:44 IST)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर आता १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या नव्या बदलांना मंजूरी मिळेल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारांनासुद्धा दिला जाईल.
 
१०२ व्या घटनादुरुस्तीमधील जो बदल आहे त्याला मंजूरी दिली जाणार आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं होतं. हा निकाल देताना १०२ वी घटना दुरुस्ती म्हणजे राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर नवे SEBC प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे. राष्ट्रपतींच्या सहीने नविन प्रवर्ग तयार होऊ शकतो, असं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारांना SEBC प्रवर्ग करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत, असं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर केंद्राने पुनर्विचार याचिका देखील दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. त्यामुळे केंद्राकडे केवळ १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करणं एवढच होतं. त्यानुसार केंद्र आता १०२ व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments