Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओखी वादळाच्या नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांना मदत करण्याची मागणी

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:55 IST)

ओखी वादळामुळे कोकणातील आंबाकाजूसुपारीकांदा तसेच इतर पिकांच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची लक्षवेधी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केली. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,किरण पावसकर , विद्या चव्हाण यांनी सहभागी होत प्रश्न उपस्थित केले.

 ओखी वादळाचे संकट नवे असून अशा संकटांना पुढील काळात तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत टकले यांनी व्यक्त केले. आंब्याचे मोहर येणार नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सध्या दिसत नसले तरी ते नुकसानच असते. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पंचनामे करणार काअसा प्रश्न पावसकर यांनी विचारला. बोंडअळी किंवा उर्वरित महाराष्ट्रात शेतीच्या नुकसानीचे जे निकष लावले जातातते निकष कोकणातल्या फळबागांना लावून जमणार नाहीअशी भूमिका किरण पावसकर यांनी मांडली.

 कोकणावर नेहमीच अन्याय केला जातो. शेती व मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात दुजाभाव होत असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी केली. किती नुकसान झाले याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ओखीसारख्या वादळाचा प्रश्न नवीन आहे. याबाबत कोकणातील सर्व सदस्यांना सर्वांनी एकत्र घेत बैठक घेऊ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments