Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील जनताच मोदी सरकारला घरी बसवेल : मोहन जोशी

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:29 IST)
केंद्रातील मोदी सरकार कृषी कायद्याबाबत आडमुठी भुमिका घेत आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु आडमुठे सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आंदोलना दरम्यान अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील जनता नक्कीच मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विश्रांतवाडी येथे शहर कॉग्रेस कमिटी वडगावशेरी मतदारसंघाच्यावतीने धरणे आदोंलन घेण्यात आले. त्यावेळी जोशी बोलत होते.
 
जोशी म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांना मिळणारे अन्नधान्य देखील बंद करण्याचा घाट मोदी सरकार घाट घालत आहे. यामुळे देशात सामान्य लोकामध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलन ही सामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे देशात कॉॅग्रेस शेतकार्‍यांना पाठिंबा देत आहे.जर सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकार्‍यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घेतले नाहीत, तर राज्यसह देशात आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments