Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान

Webdunia
रविवार, 13 जून 2021 (10:36 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
 
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
 
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments