Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नासाठी टाकीवर चढून ड्रामा

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:19 IST)
लग्नाला घरच्यांकडून होकार मिळावा म्हणून प्रेमीयुगलने ‘शोले स्टाइल’ड्रामा करत 10 तास पाण्याच्या उंच टाकीवर घालवले. नंतर कुटुंब, पोलिस त्यांची समजूत काढत होते, यानंतर हे प्रेमीयुगल खाली उतरले. हा गोंधळ रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होता. 
 
बीड शहरातील तरुण हा कामानिमित्त हिंगोलीत काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली, नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान याची माहिती कुटुंबियांना झाली असता महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत, हे त्यांना कळाले. पण ती पतीपासून दूर राहते. यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यनंतर सदरील तरुण पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधून बीड येथे आणण्यात आले. दरम्यान रविवारी तरुण व महिला बीडमध्ये  अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न करून द्या म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर जाऊन बसून गेले. दरम्यान ‍पोलिसांनी याची माहिती झाल्यावर ते घटनास्थळी पोहचले. नगरसेवकही आले, बघता बघता बघणार्यांाची मोठी गर्दी झाली.सर्वांनी या प्रेमीयुगलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली, यानंतर रात्री उशीरा हे प्रेमीयुगल खाली उतरले असल्याचे सांगितले जाते.   
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments