Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पडळकरांचा निशाणा, म्हणाले – ‘संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय

Webdunia
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:16 IST)
उत्तर प्रदेशातील लखीमपूर  हिंसाचारावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तुलना थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. त्यावरून भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार पडळकर यांनी आपल्या ट्विटरवर जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रुपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय असे म्हंटले आहे.

सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी लखीमपूर खेरी प्रकरणात प्रियंका गांधी यांनी लढा उभारला त्यावेळी त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली असे म्हंटले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. सीबीआय, ईडीसारख्या तपस यंत्रणा कोणालाही अटक करत आहे. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला असताना त्याची झोप प्रियांका गांधी यांनी उडवली आहे. यानिमित्ताने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक प्रियंका गांधींमध्ये दिसते, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments