Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2024 (09:13 IST)
महाराष्ट्रातून सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. दहावी पर्यंत शिकलेल्या तीन तरूणांनी एक आयटी कंपनी स्थापित करून मोठी फसवणूक केली आहे. आरोपींची नागपूरच्या एका व्यक्तीची 5 लाखाची फसवणूक केली असून तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींची समर्थ आयटी सोल्युशन नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीची माहिती गुगल ने दिली. 

नागपूरच्या महाल भागातील रहिवासी अतुल उईके यांना मे महिन्यांत मोबाईल वर फोन पे  ॲप चालवताना काही समस्या येत होत्या. त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क कसा करू शकतो ही माहिती शोधली आणि त्यांना या कंपनीचा नंबर सापडला. कंपनीतील या आरोपींनी व्हिडीओ कॉल करून पीडितच्या मोबाईल मध्ये काही सेटिंग करून रात्री पर्यंत  ॲप सुरू असल्याचा दावा केला.

मात्र पीडितच्या खात्यातून दोन दिवसांत तीन वेळा 5 लाख रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना मुंबईतून अटक केली आहे.नागपूर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

सर्व पहा

नवीन

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

Budget Session: आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

पुढील लेख
Show comments