Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेसची २५ ऑगस्टला निघणार ‘पोलखोल यात्रा’

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:08 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची ‘पोलखोल यात्रा’ २० ऑगस्ट ऐवजी २५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असल्याने ही यात्रा पुढील ढकलण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले ही यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून महाजनादेश यात्रेस सुरुवात केली होती तिथूनच कॉंग्रेसही पोलखोल यात्रा सुरू करणार आहे .
 
दरम्यान, कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर ‘दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच’ अशी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नंदुरबार येथून सुरुवात होणार आहे. तर पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस १९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments