Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्रिपुरा हिंसाचार निषेधार्थ, महाराष्ट्रातील या तीन शहरांमध्ये हिंसाचार ,पोलिसांवर दगडफेक, 2 पोलिसकर्मी जखमी

Webdunia
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:33 IST)
त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी आज महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची घोषणा केली. यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत. नांदेडमध्ये हिंसक जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली या  हिंसाचारात अतिरिक्त एसपी, एका निरीक्षकासह 7 जण जखमी झाले आहेत. सरकारी वाहनांचे नुकसान झाले. मालेगावातही बराच गदारोळ झाला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सध्या परिसरात शांतता आहे. त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
 
भारत बंदच्या आवाहनावरून शुक्रवारी महाराष्ट्रात हिंसाचार वाढला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. त्यामुळे नांदेड, मालेगावसह अनेक भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. अशा स्थितीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत.
 
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "परिस्थिती नियंत्रणात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी वैयक्तिकरित्या त्यावर लक्ष ठेवत आहे. जर कोणी दोषी आढळले तर त्याला सोडले जाणार नाही. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे." मी सर्वांना आवाहन करतो. मी पोलिसांनाही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करतो. संयम आणि शांतता राखा." 
''त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला. नांदेड, मालेगाव, अमरावती आणि इतर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो," ते म्हणाले.
 
 अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी म्हणाले की, पाच तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या इथे शांतता आहे. या निषेध मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नाही. तक्रारींच्या आधारे आम्ही संबंधितांवर कठोर कारवाई करू.
 
मालेगावचे एसपी सचिन पाटील यांनी आज सायंकाळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले. मालेगावात सध्या शांतता आहे. नियमित गस्त सुरू झाली आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी अफवा पसरवणे थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अलीकडेच बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हिंसाचार झाल्याच्या बातम्यांनंतर त्रिपुरामध्ये जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments