Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी! लग्नाहून परतताना झाडाखाली थांबले, वीज कोसळून आई-वडील ठार तर दोन्ही मुली जखमी

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:05 IST)
बदलत्या हवामानामुळे कोसळलेल्या वीजेने एका दाम्पत्याचा जीव घेतला असून या दाम्पत्याच्या दोन्ही अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. वीजेचा कडकडाट झाला आणि अचानक वीज कोसळली. यादुर्घटनेत मालुंजेवाडी येथील पती आणि पत्नी जागीच ठार झाले आहेत. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
 
तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ दामू लोते (वय 35) आणि सुनीता दशरथ लोते (वय 30) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.  हे दोघे जण गिऱ्हेवाडी येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वादळी पाऊस आल्याने पिंपळगाव घाडगा येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ ते थांबले. मात्र त्याचवेळी सळसळती वीज कोसळली. त्यात हे दोघेही जागीच ठार झाले. सोबत असलेल्या मुली तेजस्विनी लोते (वय 7), सोनाली लोते (वय 5) यांच्यासह गिऱ्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिऱ्हे (वय 20) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी ४ ते ५ च्या सुमाराला घडली. घटनास्थळी पीआय अनिल पवार पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली.लोते कुटुंबियांवर कोसळलेली ही वीज आणि त्यामुळे झालेली दुर्घटना यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या प्रकृतीमुळेही ग्रामस्थ काळजीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments