Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2024 (14:18 IST)
आज देशभरातील करोडो शेतकरी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत, पंतप्रधान  किसान सन्मान निधी योजना विशेषत: देशातील गरीब जनतेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवते.

प्रत्येक हप्त्यात 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.पंतप्रधान किसान योजना मध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हफ्ता जमा होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हफ्ता 2000 रुपये जून किंवा जुलै मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. 

या योजने अंतर्गत 16 वा हफ्ता फेब्रुवारी मध्ये जमा केला गेला. आता या योजनेतील 17 वा हफ्ता चार महिन्यानंतर म्हणजे जून मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या साठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम PM किसान पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे भेट देऊन तुम्हाला सर्व आवश्यक चरणांचे पालन करावे लागेल. नंतर महत्वाचे कागदपत्रे डाउनलोड करावे लागतील. आवश्यक तपशील भरा. नंतर फॉर्म जमा करा. अशा प्रकारे अर्ज करू शकाल.शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. असे केले नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. 

 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments